एकीकडे न्यायालयात सत्तसंघर्षांची लढाई सुरू असताना दुसरीकडे 'मुळात हा सत्तासंघर्ष नाहीच. ही चोरांबरोबरची लढाई आहे. या चोरांना केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने बळ दिलं आहे. या चोर, डाकू आणि केंद्रातील त्याचे सरदार यांच्या विरुद्ध हा संघर्ष आहे' अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे आणि भाजपा सरकारवर केली. तसेच 'हा संघर्ष सुरूच राहणार असून ही सत्याची लढाई आहे' असे वक्तव्यही त्यांनी केले