नवी मुंबईत मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बोलावलं होतं. यावेळी त्यांची मुलाखतही घेण्यात आली. यादरम्यान राज्यातील सध्याच्या राजकारणावर बोलताना 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय' असे विधान त्यांनी केले त्यानंतर एकमेव आमदार राजू पाटील यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, 'मी त्याला म्हंटल आहे घेतो का जबाबदारी मग कळेल आमचं काय जळतं ते कळेल तुम्हाला' अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरेंनी केली.