महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांकडून सतत वक्तव्य केली जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात देखील त्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. दरम्यान या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी शुक्रवारी लोकसभेत खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.
#DhairyasheelMane #AmitShah #MaharashtraKarnatakaBorder #Politics #Dispute #EknathShinde #Sansad #Loksabha #WinterSession #मMaharashtraPolitics #BJP