देशभरात आज शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. तर औरंगाबादमध्ये यात आणखी भर पडली आहे ती म्हणजे महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरवरून होणारी पुष्पवृष्टी. औरंगाबाद जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडून ही पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.