नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न; वडेट्टीवारांची घोषणा

2021-10-13 115

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. नुकसान भरपाई होऊ शकत नसली तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून पुढच्या आठवड्यापासून या मदतीचे वाटप केले जाणार आहे.

Videos similaires