Coronavirus In India: देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ४,३२९ रुग्ण दगावले; महाराष्ट्रात 24 तासात 28,438 जणांना संसर्ग

2021-05-19 2

रोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून मृत्यु ही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. देशभरात गेल्या २४ तासांत आजपर्यंतचे सर्वाधिक ४,३२९ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृतांची एकूण संख्या दोन लाख ७८ हजार ७१९ वर पोहोचली आहे.