दुर्दैवाने पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास हा नेहमीच रक्तरंजित आणि हिंसाचाराने भरलेला आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रतिक्रिया तिथे उमटली असताना दोन्ही बाजूंनी संयम राखणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तेथील हिंसाचारावर दिली आहे. हिंसाचार रोखणं सत्तेत असणाऱ्या पक्षाची जबाबदारी आहे असं सांगताना टाळी एका हाताने वाजत नाही म्हणत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
#SanjayRaut #WestBengalElections #MamtaBanerji