सांगली : ‘शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो’, असं सांगत भिडे गुरुजी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हिंसाचाराच्या आरोपानंतर भिडे गुरुजी यांनी माध्यमांशी प्रथमच संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हिंसाचाराची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी निराधार आरोप केले जात आहे. सरकारनं कुठल्याही यंत्रणांमार्फत चौकशी करावी. असं आव्हानही भिडे गुरुजी यांनी दिलं आहे. हिंसाचाराच्या आरोपानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांशी बोलत होते.
For latest breaking news, other top stories log on to: &