Separatists Dont Believe In Insaniyat Kashmiriyat Jamuriyat Say Home Minister Rajnath Singh

2016-09-05 0

फुटीरवाद्यांचा इन्सानियत, काश्मिरियत आणि जमुरियतवर विश्वास नाही. त्यांच्याकडे काश्मीर खोऱ्यातील शांततेविषयी चर्चा करण्यासाठी गेल्यानंतरही त्यांचा प्रतिसाद मिळत नाही, हे निराशाजनक आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत सरकार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळ चिंतीत आहेत, अशी प्रतिक्रिया देत येथील चिघळलेली परिस्थिती सुधारण्याबाबत आम्हा सर्वांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना दिली.