Shivsena Leader Sanjay Raut Criticized Bjp Govt Over Attack On Vilas Shinde

2016-09-01 1

मुंबई पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला. गुंडांवर जरब बसवण्यासाठी फक्त कागदावरचा कायदा आणि मंत्रालयातील खुर्ची उपयोगी नाही. तर त्या खुर्चीवर कोण बसले आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे सांगत संजय राऊत यांनी राज्यातील गृह खात्याचा कार्यभार स्वतंत्र व्यक्तीकडे द्यावा, अशी मागणी केली. त्याचवेळी जर गृह खाते शिवसेनेकडे असते, तर या गुंडांना आधीच जरब बसला असता, असे सांगत शिवसेनेकडे गृह खाते देण्याची अप्रत्यक्ष मागणीही त्यांनी केली.

Videos similaires